Havaman Aandaj Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की सध्या पावसाने राज्यभरात विश्रांती घेतली आहे. परंतु, याच विश्रांतीला आपण असे म्हणू शकतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे. कारण येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर पंजाबराव यांनी देखील हाच अंदाज त्यांच्या भाषणामध्ये वर्तवला आहे. यामुळे पुढील येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आपण जर थोडा विचार केला तर असे दिसून येते की गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु काही जिल्ह्यात अजूनही झिमझिम स्वरूपात पाऊस कधीमधी पडतो. त्याचबरोबर मराठवाड्यात 14 तारखेला जिम जिम स्वरूपात पाऊस पडला होता. मात्र मुसळधार पाऊस राज्यभरात कोठेही झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच उडीद काढणी करण्यासाठी वेळ मिळाला आहे.
परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस पडत होता यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर सोयाबीन देखील जळून खाक झाली. त्याचबरोबर अजून हा पाऊस किती दिवस राहील असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात पडू लागला होता. परंतु काही दिवसातच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.Havaman Aandaj Today
त्याचबरोबर हवामान खात्याने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रभरात 21 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी 21 सप्टेंबर पूर्वीच शेतातील सर्व कामे आवरून घ्यावेत. त्याचबरोबर सोयाबीन आणि उडीद काढून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे झाकून ठेवावे. अशी माहिती देखील हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी दिले आहे.
महाराष्ट्र मध्ये पूर्व विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र आणि सर्वात शेवटी कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्या अगोदर सर्व भागात तुरळक पाऊस पडणार आहे. आणि 23 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर शेतात देखील पाणी पुसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.Havaman Aandaj Today