Toll New Rules: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नवनवीन योजना आणत आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता टोल भरण्याबाबत देखील प्रवाशांसाठी एक सुखद निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती…
केंद्र सरकारने जीपीएस आधारित टोल यंत्रणेला आजच मंजुरी दिली आहे. यामुळे खोल भरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता टोल पासून सुटका मिळणार आहे. म्हणजेच या योजनेमुळे नागरिकांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच या नवीन यंत्रणेमुळे प्रवास सोपा आणि सुखकर होईल. रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नॅशनल हायवे फीज नियम 2008 मध्ये सुधारणा केली आहे. आणि यानुसार आता सॅटॅलाइट आधारित यंत्रणेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीचा समावेश करण्यात आलेला आहे.
या नवीन यंत्रणेमुळे वाहनाचा टोल हा जीपीएस च्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो ही यंत्रणा फास्टट्रॅक सारखेच असणार आहे परंतु आपल्या वाहनाला टोल नाक्यावर थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. आपण टोलनाक्यावरून सुसाट वेगाने देखील जाऊ शकतो. यामुळे आपला नक्कीच वेळ वाया जाणार नाही.Toll New Rules
नवीन नियमानुसार टोल नाक्यावर काय बदल होणार संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
- आता टोल नाक्यावर जीपीएस आणि ऑन बोर्ड युनिट (obu) च्या माध्यमातून टोल वसुली वाहन चालकाकडून करण्यात येणार आहे.
- तसेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट सिस्टीम म्हणजेच जीएनएसएस ओ बी यु यामध्ये असलेले वाहने त्यांच्या ठराविक अंतरावर ऑटोमॅटिक टोल भरू शकतात.
- 2008 च्या नियमांमधील नियम क्रमांक सहा मध्ये बदल करण्यात आलेला आहे.
- या कारणामुळे जी एन एस एस असलेल्या वाहनांसाठी टोल नाकावर विशेष लेन तयार करण्यात येणार आहे.
- त्याचबरोबर विशेष लेनमध्ये वाहनांना मॅन्युअल टोल भरण्याची गरज भासणार नाही.Toll New Rules